
, दापोडी ते वाकड या संपूर्ण पट्ट्यामध्ये लोकसंख्या, बहुमजली निवासी प्रकल्प, व्यावसायिक संकुले, शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल्स, कोचिंग क्लासेस, पेट्रोल–CNG स्टेशन, LPG गोडाऊन, मल्टिप्लेक्स, हॉटेल व्यवसाय इत्यादी अत्यावश्यक व उच्च-जोखमीच्या घटकांची घनता लक्षणीयरीत्या वाढलेली आहे.
सदर परिसरात आजतागायत एकही मनपा अग्निशमन केंद्र उपलब्ध नसून, BRT मार्ग, मेट्रो मार्ग, रेल्वे लाईन व कायमस्वरूपी वाहतूक कोंडीमुळे विद्यमान अग्निशमन केंद्रांहून घटनास्थळी पोहोचण्यास अनावश्यक विलंब होतो. परिणामी आग, अपघात, पूर, जंगल/गवत आग इत्यादी आपत्कालीन प्रसंगी नागरिकांच्या जीवित व वित्तसुरक्षेला गंभीर धोका निर्माण होत आहे.
वरील परिस्थिती लक्षात घेता, नमूद परिसरासाठी तातडीच्या प्राथमिकतेने मनपा अग्निशमन केंद्र स्थापन करून आवश्यक कर्मचारी, वाहने व उपकरणे उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे
















