
प्रतिनिधी : राष्ट्रवादी महिला काँग्रेसची राज्यस्तरीय बैठक आज प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील व पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीमध्ये मा. अजितजदादा पवार यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील यांनी या बैठकीला संबोधित केले. देशभरात आणि राज्यभरात अनेक घटना घडत असल्याने लोकांचा आज उद्रेक होत आहे. या गोष्टीबाबत प्रबोधन करणे गरजेचे आहे. त्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसने हाती घेतलेला जन जागरण यात्रा उपक्रम महत्त्वाचा आहे.
नुसते हायवे झाले म्हणजे विकास झाला असे या सरकारला वाटते. महागाई, रोजगार हा विषय सरकारला महत्त्वाचा वाटत नाही. यासाठी भगिनींनी पुढे यायला हवे. या सरकारविरोधात आवाज उठायला हवा. जिल्ह्याजिल्ह्यात, गावागावात हा उपक्रम यशस्वी करायला हवा, असे आवाहन प्रदेशाध्यक्षांनी केले.
प्रसार माध्यमे आपली भूमिका लावून धरतील अशी अपेक्षा ठेवू नका मात्र समाज माध्यमावर आपल्या या उपक्रमाची जोरदार प्रसिद्धी करा. हे सरकार कशाप्रकारे सत्तेत आले आहे हे संपूर्ण राज्याला माहिती आहे. त्यामुळे आपण या गोष्टीचा प्रचार करून लोकांसमोर यांची फसवेगिरी उघडी पाडावी, असेही प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्ष आम्ही रक्ताचं पाणी करून इथपर्यंत आणला आहे. त्यामुळे सर्वांनी एकसंध राहून काम करावे. एखादी महिला पक्ष सोडत असेल तर त्यांची विचारपूस करा, त्यांचं मत बदला, प्रत्येकाचा मान राखा, असे मार्गदर्शन जयंतराव पाटील यांनी केले.
आपला पक्ष हा सर्वात जास्त चर्चेत असलेला पक्ष आहे. भाजपला खात्री आहे हा पक्ष राज्यात काहीही करू शकतो. त्यामुळे आपल्यावर प्रहार केला जात आहे. येत्या काळात आपल्यावर अनेक अधिक प्रहार होतील, आपण मात्र घाबरून जायचं नाही. लढा देणे, संघर्ष करणे हे आपले कर्तव्य आहे. २०२४ ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा इतिहास घडवेल, अशा विश्वास प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्ष खासदार फौजिया खान, खासदार वंदना चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण, आमदार सुमनताई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई विभागीय कार्याध्यक्ष राखीताई जाधव, राज्य महिला निरीक्षक आशाताई मिरगे, आशा भिसे, राज्य महिला समन्वयक सुरेखाताई ठाकरे, विभागीय अध्यक्ष वैशाली नागावडे, वैशाली मोटे, कविता म्हेत्रे, शजिया शेख, वर्षा निकम, शाहीम हकीम, अर्चना घारे आदी


















